राज्यकर्त्याच्या कार्यप्रणालीवर जनता वैताकली ? राज्यातल्या आंबट कडीला पुन्हा आला उत्त !

 

राज्यकर्त्याच्या कार्यप्रणालीवर जनता वैताकली ? राज्यातल्या आंबट कडीला पुन्हा आला उत्त !

नायगाव रुई प्रतिनिधी माधव पवार

 अख्या राज्यातले धनदाडंग्या पासून ते गोरगरीब जनते पर्यंत राज्यातल्या राज्यकर्त्यांच्या कार्यप्रणालीवर जनता चांगलीच वैताकली असून सरकारच्या मनमानी निर्णयामुळे लोकांचे मोठया प्रमाणात बेहाल होऊन आर्थिक नुकसानी बरोबर अनेक व्यवहार ठप्प होत असताना ही राज्यातले आघाडी सरकार परत एकदा आंबट कडीला उत्त पुन्हा आणले असल्याचे ग्रामीण भागातल्या तमाम जनतेतुन बोलल्या जात असले तरी प्रशासन फक्त कोरोनाची आकडे वारीच सांगत असल्यामुळे राज्यात लॉकडाऊन पडते की काय असी जनतेत भीती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे
गेल्या कांही वर्षाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोट बंदी करून लोकाला आर्थिक कचाट्यात खेचले होते तर आता केंद्र सरकारसह राज्य सरकार कोरोना महामारीच्या नावाखाली लोकांना वेठीस धरत असल्याचे त्यांच्या निर्णया वरून कळत असून तब्बल दोन ते तीन महिन्यापासून राज्यात राज्य परिवहन मांडळाच्या बसेस वाहक व चालक बेमुदत संपावर गेल्यामुळे राज्यातल्या बसेस बंद आहेत जनतेला व ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असला तरी एसटी कर्मचाऱ्याना अद्याप न्याय मिळाला नाही व बसेच चालू नसल्यामुळे राज्यातल्या जनतेची मोठया प्रमाणात गैरसोय होताना ही आघाडी सरकार लक्ष देण्यास तयार नाही प्रशासन जनतेचा व एसटी कर्मचाऱ्याचा अंत पाहतो की काय असा प्रश्न जनतेला पडला आहे
राज्यातले आघाडी सरकार असे बनले काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्ष असे तीन पक्ष मिळून सरकार बनले असून राष्ट्रीयनेते तथा राष्ट्रवादीकाँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण या राजकारणातील राज्यकर्त्याच्या निर्णयाला जनता चांगलीच वैतागली असल्यामुळे राज्यात आंबट कडीला पुन्हा उत्त आला 

राज्यात आघाडी सरकार तर केंद्रात भाजपाचे सरकार आले तेव्हा पासून कोरोना महामारीच्याच लाटावर येत असल्याचे सरकार सांगत असून पहिली लाट संपली दुसरी ही संपली तरी तिसरी ही लाट आली काय ? असे ही जनतेतून बोलल्या जात असून सदरच्या आघाडी सरकारच्या कार्यकाळात रोजगाराच्या हाताला काम नाही पांदन रस्त्याचे कामे बंद आहेत तर रोजगार हमीच्या कामाचा बेपत्ताच झाला असल्याचे जनसामान्य माणसातून बोलल्या जात असून ग्रामीण भागातील जनता आर्थिक चनचंनीत असल्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे परंतु शासन या बाबीकडे लक्ष देण्यास तयार नसून केवळ कोरोनाचे पेशन्ट वाढले असल्याचे जाहीर करत शाळा बंद करण्याचा निर्णय घेत असल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या